प्रश्न १. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
(अ) पृथ्वीच्या परिवलनास २४ तासांचा कालावधी लागतो. एका तासात पृथ्वीवरील.
(i) ०५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.
(ii) १० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.
(iii) १५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.
(iv) २० रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.
उत्तर - १५ रेखावृत्ते सूर्यासमोरून जातात.
(आ) पृथ्वीवरील कोणत्याही दोन ठिकाणांच्या स्थानिक वेळेतील फरक समजण्यासाठी
(i) दोन्ही ठिकाणची मध्यान्हाची वेळ माहीत असावी लागते.
(ii) दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो.
(iii) दोन्ही ठिकाणांच्या प्रमाण वेळेतील फरक माहीत असावा लागतो.
(iv) आंतरराष्ट्रीय वाररेषेनुसार बदल करावे लागतात.
उत्तर - दोन्ही ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक अंतरातील फरक माहीत असावा लागतो.
(इ) कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत
(i) १५ मिनिटांचा फरक असतो.
(ii) ०४ मिनिटांचा फरक असतो.
(iii) ३० मिनिटांचा फरक असतो.
(iv) ६० मिनिटांचा फरक असतो.
उत्तर - १५ मिनिटांचा फरक असतो.
प्रश्न २. भौगोलिक कारणे लिहा.
(अ) स्थानिक वेळ मध्यान्हावरून निश्चित केली जाते.
उत्तर -
सूर्योदयानंतर जसजसा सूर्य आकाशात वर सरकतो तसतशी आपली सावली लहान होत जाते. सर्वसाधारणपणे मध्यान्हाच्या वेळी सावलीची लांबी सर्वांत कमी असते. मध्यान्होत्तर काळात सूर्य क्षितिजाकडे सरकल्यामुळे सायंकाळपर्यंत पुन्हा आपली सावली लांब होत जाते. पृथ्वीवर, मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर म्हणजेच उत्तर ध्रुववृत्तापासून ते दक्षिण ध्रुववृत्तापर्यंत सर्वत्र सारखी असते. एखादया ठिकाणच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणाची स्थानिक वेळ होय.
(आ) ग्रीनीच येथील स्थानिक वेळ जागतिक प्रमाण वेळ मानली जाते.
उत्तर -
जागतिक व्यवहारासाठी जागतिक प्रमाण वेळ (०° रेखावृत्त) म्हणून इंग्लंडमधील ग्रीनीच येथील स्थानिक वेळ (GMT - Greenwich Mean Time) विचारात घेतली जाते. इतर देशांच्या प्रमाण वेळांतील फरक ग्रीनीच वेळेच्या संदर्भाने सांगितला जातो. भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनीच येथील वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटांनी पुढे आहे. ग्रीनीच येथे संध्याकाळचे ५ वाजले असतील तर भारतात रात्रीचे १०.३० वाजलेले असतात.
(इ) भारताची प्रमाण वेळ ८२° ३०' पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेनुसार निश्चित केली आहे.
उत्तर -
भारताची प्रमाण वेळ मिर्झापूर शहरावरून ( अलाहाबाद, उत्तर प्रदेश) जाणाऱ्या ८२°३०' पूर्व या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरवली जाते. हे रेखावृत्त भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराच्या संदर्भाने देशाच्या मध्यभागी आहे. या रेखावृत्ताची स्थानिक वेळ भारताची प्रमाण वेळ म्हणून निवडली गेली आहे. या रेखावृत्तावर सूर्य मध्यान्ह स्थितीत आला म्हणजे भारतातील सर्व ठिकाणी दुपारचे १२ वाजले असे मानले जाते. ८२°३०' पूर्व रेखावृत्तावरील स्थानिक वेळेत आणि भारतातील इतर कोणत्याही ठिकाणच्या स्थानिक वेळेत एक तासापेक्षा अधिक फरक पडत नाही.
(ई) कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाण वेळा आहेत.
उत्तर -
(१) कॅनडा देशाचा रेखावृत्तीय विस्तार ५२°३७' पश्चिम रेखावृत्त ते १४१० पश्चिम रेखावृत्त इतका आहे.
(२) कॅनडा देशाच्या अतिपूर्वेकडील व अतिपश्चिमेकडील रेखावृत्तांमधील अंशात्मक फरक हा सुमारे ८८ अंशांचा आहे.
(३) कॅनडाच्या अतिपूर्वेकडील आणि अतिपश्चिमेकडील रेखावृत्तांवरील स्थानिक वेळांत सुमारे ३५२ मिनिटांचा म्हणजेच, ५ तास ५२ मिनिटांचा फरक पडतो. त्यामुळे कॅनडात केवळ एकच प्रमाणवेळ मानणे गैरसोयीचे ठरते. म्हणून दैनंदिन व्यवहारांत सुसूत्रता आणण्ण्यासाठी कॅनडा या देशात सहा वेगवेगळ्या प्रमाणवेळा आहेत.
प्रश्न ३. थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) ६०° पूर्व रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील, तर ३०° पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील ते स्पष्ट करा.
उत्तर -
१) ६०° पूर्व रेखावृत्त व ३०० पश्चिम रेखावृत्त या दोन रेखावृत्तांतील अंशात्मक फरक = ९०° (0° रेखावृत्त ते ६०° पूर्व रेखावृत्त या दोन रेखावृत्तांतील ६० अंशांचा फरक + 0° रेखावृत्त ते ३०० पश्चिम रेखावृत्त या दोन रेखावृत्तांतील ३० अंशांचा फरक = ९० अंशांचा फरक.)
२) या दोन रेखावृत्तांतील एकूण वेळेतील
फरक : = ९०x४
= ३६० मिनिटे
= ३६० मिनिटे : ६० मिनिटे = ६ तास
३) पूर्वेकडील रेखावृत्तांवरील स्थानिक वेळ ही पश्चिमेकडील रेखावृत्तांवरील स्थानिक वेळेच्या पुढे आणि पश्चिमेकडील रेखावृत्तांवरील स्थानिक वेळ ही पूर्वेकडील रेखावृत्तांवरील स्थानिक वेळेच्या मागे असते.
४) म्हणजेच, ६०° पूर्व रेखावृत्तावर दुपारचे बारा वाजले असतील, तर ३०° पश्चिम रेखावृत्तावर सकाळचे ६ वाजले असतील.
(आ) एखादया प्रदेशाची प्रमाण वेळ कशी निश्चित केली जाते ?
उत्तर -
१) एखादया देशात रेखावृत्तानुसार भिन्न स्थानिक वेळा विचारात घेतल्यास देशभरातील दैनंदिन व्यवहारात सुसंवाद राहणार नाही. देशात प्रत्येक ठिकाणाच्या स्थानिक वेळेनुसार व्यवहार केल्यास वेळेची विसंगती निर्माण होऊन दैनंदिन व्यवहारात गैरसोय होईल. म्हणून देशाच्या सर्वसाधारण मध्यवर्ती ठिकाणाहून जाणाऱ्या रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही प्रमाणभूत मानण्यात येते. ती त्या देशाची प्रमाण वेळ म्हणून निवडली जाते. देशातील सर्व ठिकाणी व्यवहारामध्ये ही प्रमाण वेळ वापरली जाते.
२) जागतिक व्यवहाराच्या दृष्टीनेदेखील निरनिराळ्या देशातील प्रमाण वेळेत सुसंगती असणे आवश्यक असते. यासाठी जगाचे २४ कालविभाग करण्यात आले आहेत. या कालविभागांची रचना मूळ रेखावृत्तावरून म्हणजेच शून्य रेखावृत्तासंदर्भाने केलेली आहे.
३) सर्वसाधारणपणे तास-दोन तासाच्या फरकापेक्षा जास्त रेखावृत्तीय विस्तार असलेल्या देशासाठी एक प्रमाण वेळ मानली जाते. परंतु त्यापेक्षा जास्त रेखावृत्तीय (पूर्व पश्चिम) विस्तार असल्यास तेथे एकच प्रमाण वेळ मानणे सोयीचे नसते, त्यामुळे अशा प्रदेशांत एकापेक्षा अधिक प्रमाण वेळा मानल्या जातात.
(इ) ब्राझीलमध्ये सावो पावलो येथील फुटबॉल सामाना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरू झाली. तेव्हा सावो पावलो येथील स्थानिक वेळ काय असेल ते स्पष्ट करा.
उत्तर -
१) सावो पावलो हे ठिकाण भारताच्या पश्चिमेकडील रेखावृत्तावर आहे.
२) सावो पावलो व भारत या ठिकाणांच्या रेखावृत्तांतील अंशात्मक फरक = १२७°३०.
३) एकूण वेळेतील फरक
= १२७.५ X ४
= ५१० मिनिटे
= ५१० मिनिटे ÷ ६० मिनिटे
= ८ तास ३० मिनिटे.
(४) म्हणजेच, भारतात सकाळचे सहा वाजले असतील तेव्हा सावो पावलो येथे रात्रीचे ९ वाजून ३० मिनिटे (म्हणजेच ८ तास ३० मिनिटांनी मागे) वाजले असतील.
प्रश्न ४. मूळ रेखावृत्तावर २१ जून रोजी रात्रीचे १० वाजले तेव्हा अ,ब,क या ठिकाणची वेळ व दिनांक कोष्टकात लिहा.
उत्तर -
प्रश्न ५. खालीलपैकी वेगवेगळ्या स्थिती 'क' या ठिकाणी कोणकोणत्या आकृतींत दिसून येतात ते आकृतींखालील चौकटींत लिहा.
(i) सूर्योदय
(ii) मध्यरात्र
(iii) मध्यान्ह
(iv) सूर्यास्त
उत्तर -



Nice
ReplyDeleteThanks keep visiting !
ReplyDeleteKunalup52
ReplyDeleteKunalup52
ReplyDeleteNishant Nikule
ReplyDeleteThaks
ReplyDelete