बदल भौतिक व रासायनिक स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सातवी सामान्य विज्ञान महाराष्ट्र बोर्ड Badal bhautik va rasayanik Swadhyay std 8th General Science solution

 







1. फरक स्पष्ट करा.


अ. भौतिक बदल व रासायनिक बदल


भौतिक बदल


1. भौतिक बदलात मूळ पदार्थांचे गुणधर्म आहेत, तसेच राहतात.

2. भौतिक बदलात मूळ पदार्थांचे संघटन कायम राहते.

3. भौतिक बदल परिवर्तनीय असतात. उदा., बाष्पीभवन, उत्कलन, विलयन.


रासायनिक बदल


1. रासायनिक बदलात मूळ पदार्थांचे गुणधर्म

बदलतात.

2. रासायनिक बदलात मूळ पदार्थांचे संघटन बदलले जाते.

3. रासायनिक बदल अपरिवर्तनीय असतात.

उदा., प्रकाश-संश्लेषण, क्षरण.





आ. आवर्ती बदल व अनावर्ती बदल



आवर्ती बदल


1. ठरावीक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येणारे बदल म्हणजे आवर्ती बदल होत.

2. आवर्ती बदलात सातत्य असते. उदा., भरती ओहोटी, घड्याळाच्या काट्यांचे भ्रमण.



अनावर्ती बदल


1. ठरावीक कालावधीनंतर पुन्हा घडतीलच असे निश्चित नसणारे बदल म्हणजे अनावर्ती बदल होय.

2. अनावर्ती बदलात सातत्य नसते. उदा., एखादे वादळ येणे.




इ. नैसर्गिक बदल व मानवनिर्मित बदल


नैसर्गिक बदल


1. एखादा बदल जो आपोआपच होतो त्या बदलाला नैसर्गिक बदल असे म्हणतात.

2. निसर्गातल्या अनेक वस्तू आपोआप बदलत असतात. जसे, फळे पिकणे.



मानवनिर्मित बदल


1. जो बदल मानव स्वतःच घडवून आणतो त्याला मानवनिर्मित बदल असे म्हणतात.

2. मानव त्याच्या फायदयाचे बदल करीत असतो. जसे, जंगले नष्ट करणे.





2. खाली दिलेले बदल कोणकोणत्या प्रकारांत मोडतात कसे ?



अ. दुधाचे दही होणे - रासायनिक अपरिवर्तनीय,सावकाश.


आ. फटाका फुटणे - रासायनिक; अपरिवर्तनीय, शीघ्र


इ. भूकंप होणे - भौतिक; रासायनिक; अपरिवर्तनीय, नैसर्गिक


ई. पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण - आवर्ती; सावकाश, नैसर्गिक,


उ. स्प्रिंग ताणणे - भौतिक; परिवर्तनीय








3. कारणे लिहा.


अ. हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी. 


उत्तर -


   खादयपदार्थाच्या वेष्टनावर मुदतीची तारीख नमूद केलेली असते. हा कालावधी संपला की त्याच्यात रासायनिक आणि अपरिवर्तनीय बदल घडतात. हे असे कालावधी संपल्यानंतरचे पदार्थ खाल्ल्यास आरोग्याला घातक ठरू शकते. म्हणून हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी.




आ. लोखंडी वस्तूस रंग लावावा.

उत्तर -

 हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायनांची प्रक्रिया, वाफ यांची प्रक्रिया होऊन लोखंडावर गंज चढतो. यालाच क्षरण असे म्हणतात. हे क्षरण रोखण्यासाठी आणि लोखंड सुस्थितीत राखण्यासाठी लोखंडी वस्तूस रंग लावावा.




इ. लाकडी वस्तूस पॉलिश करावे.

उत्तर -

लाकडी वस्तूवर सहज बुरशी किंवा वाळवी लागू शकते. हा बदल नैसर्गिक परंतु अपरिवर्तनीय आहे. पॉलिश लावल्याने लाकडामध्ये नैसर्गिक बदल होण्याची प्रक्रिया मंदावते. हा हानिकारक बदल रोखण्यासाठी लाकडी वस्तूस पॉलिश करावे.



ई. तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कल्हई करावी.

उत्तर -

तांब्यापितळेच्या भांड्यांना कथिलाचा लेप देतात. याला आपण कल्हई करणे असे म्हणतो. कारण हवेतील ऑक्सिजन, आर्द्रता, रसायने आणि वाफ यांची तांबे, पितळ अशा धातूंवर प्रक्रिया होते. यामुळे तांबे, पितळ अशा धातूंवर नैसर्गिकरीत्या हिरवट रंगाचा थर तयार होतो. हे क्षरण रोखण्यासाठी तांबे, पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कल्हई करतात.



उ. कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो.

उत्तर -

कोरडा रुमाल पाण्यात बुडवला की तो पाणी शोषतो. पण रुमाल वाळण्यासाठी रुमालातून पाण्याचे बाष्पीभवन व्हावे लागते. बाष्पीभवन हा भौतिक बदल वातावरणाच्या तापमानावर व आर्द्रतेवर अवलंबून असतो, म्हणून कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो, परंतु ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो.


4. कशाचा विचार कराल 


अ. पदार्थांमध्ये झालेला भौतिक बदल ओळखायचा आहे.

उत्तर -

काही बदल घडताना मूळ पदार्थांचे गुणधर्म आहे तसेच राहिले. म्हणजेच त्यांचे संघटन कायम राहिले. कोणताही नवीन पदार्थ तयार झाला नाही. या प्रकारे भौतिक बदल ओळखू शकतो.



आ. पदार्थांमध्ये झालेला रासायनिक बदल ओळखायचा आहे. 

उत्तर -

जे बदल घडल्याने मूळ पदार्थांचे रूपांतर नवीन व वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थांत होते अशा प्रकारे रासायनिक बदल ओळखू शकतो.


5. परिच्छेद वाचून बदलाचे विविध प्रकार नोंदवा.


संध्याकाळचे सहा वाजायला आले होते. सूर्य मावळत होता. मंद वारा सुटला होता. झाडाची पाने हलत होती. साहिल अंगणात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करत बसला होता. भूक लागली म्हणून तो घरात गेला. आईने कणीक भिजवून पुऱ्या तळल्या. गरमागरम पुऱ्या खाताना त्याचे लक्ष खिडकीबाहेर गेले. पाऊस सुरू झाला होता. विजा चमकत होत्या. मंद प्रकाशात साहिल जेवणाचा आनंद घेत होता.

उत्तर -

1) संध्याकाळचे सहा वाजायला आले होते. (वेळ - आवर्ती, परिवर्तनीय)


2) सूर्य मावळत होता. ( सूर्यास्त - आवर्ती, परिवर्तनीय)


3) मंद वारा सुटला होता. (वारा वाहणे- भौतिक, अनावर्ती)


4) - झाडाची पाने हलत होती. (वाऱ्याने हालचाल - भौतिक, अनावर्ती)


(5) साहिल अंगणात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करीत बसला होता. (मातीपासून खेळणी बनवणे-भौतिक)


6) भूक लागली म्हणून तो घरात गेला. (भूक लागणे - आवर्ती)


7) आईने कणीक भिजवून पुऱ्या तळल्या. (तळणे- भौतिक, अपरिवर्तनीय) 


8) गरमागरम पुऱ्या खाताना त्याचे लक्ष खिडकीबाहेर गेले. (इकडे तिकडे पाहणे- अनावर्ती) 


9) पाऊस सुरू झाला होता. (पाऊस पडणे-भौतिक, आवर्ती ठरवीक मोसमातच आल्यास) 


10) विजा चमकत होत्या. (वीज चमकणे- भौतिक रासायनिक, शीघ्र)

Post a Comment

Previous Post Next Post